Thursday, May 25, 2017

नैसर्गिक ओढ v/s Socio-economic pressures.

वागायचं कसं ---काही केलं तरी काहीतरी बरोबर असतं आणि काहीतरी चुकलेलं असतं .
सैराटच्या निमित्ताने एक प्रश्न :--ते जे वय दाखवलंय समजा १७-२० समजू , त्या वयात निसर्ग थैमान घालतो आणि प्रेमात पडतातच . या वयात गर्भधारणा पटकन होते आणि साधारण २३-२४ पर्यंत मुलीची delivery पण सोप्पी असते .
...
पण शिक्षण अपुरे असते आणि मूल झाले तर अपुरे राहण्याची शक्यता जास्त . मग उत्पन्न पण कमी राहते .
लवकर लग्न करून , बाळ होऊ देऊन ,शिक्षण पूर्ण करणारे क्वचित असतील .
उशिरा पर्यंत शिकत बसले , किंवा लवकर लग्न करून आत्ता मुल नको करत बसले आणि मग झालंच नाही तरी प्रोब्लेम कारण आपल्या समाजात तुम्ही काहीही असा मुल असलंच पाहिजे , नाहीतर आयुष्याला अर्थ नाही . पण आता लोकांनी काळजी करू नये . त्या department मध्ये खूपच medical advances झाले आहेत .
फार उशिरा मुलं झाली तरी प्रोब्लेम असतात .
पण आता समाजाची गरज काय आहे ? मुलामुलींनी स्वतःला घडवणं जास्त गरजेचं आहे का ? मुल लवकर झाले तर trap झाल्यासारखे होईल का ? तो मुलगा किंवा मुलगी जेवढे achieve करू शकले असते त्या पेक्षा कमी पातळीवर राहतील का ? मग आयुष्यभर खंत करत राहतील का ?
थोडा संयम ठेवला तर योग्य नाही का ?
बऱ्याच मुलींनी मुलांवर बलात्काराच्या cases टाकल्या आहेत . कालपर्यंत जे प्रेम वाटत होतं ते एकदम बलात्कारा पर्यंत कसं गेलं हे मुलांना कळलंच नाही . त्यात पोलिस , कोर्ट , आणि समाजात मानहानी आणि पैसे पण खूप दिले जातात . मुलांकडून आईवडिलांची आर्थिक मदतीची अपेक्षा असते , हे झेंगट मागे लागलं तर सगळं कुटुंब खचतं .
आजकाल जग खूप इंटरेस्टिंग झालंय , कितीतरी शिकण्या सारखं आहे , करण्या सारखं आहे . आता तरुण पिढीला खूप उज्ज्वल भवितव्य आहे पण ते त्यांनी आपलं आयुष्य संयमाने हाताळलं तर .
Sairat coffee .

No comments:

Post a Comment