शहरातल्या लोकांना शेतीतलं काही कळत नाही , खरं आहे ते , शहरातल्या लोकांची शेती म्हणजे बाल्कनीतल्या कुंड्यांना आठवणीने पाणी घालणे . तेवढं केलं तरी खूप .
आता काही जणांचे बंगले , बागI आहेत पण आता फार कमी .
आता हे शेतकरी आणि कर्जमाफी आपला विषय नाही , मान्य !! पण सारखं सगळ्या चॅनेल वर हीच चर्चा , कानावर पडतंच . आणि सरकार का नाही म्हणत आहे हे पण समजत नाही .
१) सरकारला नगद पैशापेक्षा . सुविधा निर्माण करायच्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यालाच फायदा होईल .
२) शेतकऱ्याला Income tax माफ आहे , बरोबर आहे पण मग एक विवरणपत्र किंवा वर्षाचा खर्चाचा अहवाल सादर करू शकतात . टॅक्स नका भरू .
३) शेतकऱ्याला सांभाळून घ्यायचं असेल आणि तो सारखा सारखा संकटात सापडत असेल तर काय चुकतंय ते बघायला नको का ?
४) हल्ली बँकI कशा 'Relationship manager ' एकेकI क्लायंटला allot करतात तास एक accounts and auditor type चा माणूस शेतकऱ्याला allot करावा . त्याने ते कुठे खर्च करतात काय चुकतंय हे सरकारच्या लक्षात आणून द्यावे म्हणजे उपाययोजना करता येतील .
ते regular saving करतात का ? शेतकऱ्याला एकदम पैसI मिळतो तेंव्हा वेडावाकडा उडवला जाऊ शकतो का ?
शहरातल्या लोकांचा महिन्याचा पगार असतो ,त्यात ते आपलं बजेट बरोबर बसवतात .
५) ३३००० कोटी हि काही लहान रक्कम नाही , हि रक्कम tax payer च्या खिशातलीच जाणार आहे , तेंव्हा taxpayer ला अधिकार आहेत प्रश्न विचारायचे .
६) दारूच्या व्यसनIपायी हे प्रकार होत असतील तर व्यसनमुक्ती केंद्रे उभारावीत .
७) लग्नात अफाट खर्च करत असतील तर सामाजिक समुपदेशन व्हावे , लग्न करून मुलगी आणायची आणि कर्जापायी तिच्या बापाने आत्महत्या करायची हे आजच्या पुरोगामी महाराष्ट्रातल्या तरुणाला शोभत नाही .
८) मूळ प्रॉब्लेम कुठे आहे हे मोकळेपणाने सांगितले तर उपाय शोधता येतिल .
९) रावसाहेब दानवेंच्या मुलाचे लग्न झाले त्यावर गदारोळ झाला , तेंव्हा टीव्ही वरच्या चर्चेत सतत हेच सांगितले कि खर्च मुलीकडच्यांनी केला , ते सधन शेतकरी आहेत .
१०) गेल्यावर्षी तूर डाळीचा तुटवडा होता , या वर्षी अफाट पीक आले आहे , मग निर्यातीची परवानगी का मिळत नाही ? हे decision पटपट घेता आले पाहिजेत
११) कुठलीही मोठ्या कामाचा जसा project report असतो तसI महाराष्ट्रातल्या शेतीचा हवा . कोण कुठलं पीक घेतो आहे , उत्पन्न साधारण किती असेल , किती किंमत येईल . हे सगळं computerize करता येऊ शकतं .
१२) करायचं असेल तर खूप करता येईल , logical and data based चर्चा असतील तर , emotional नकोत.
No comments:
Post a Comment