16-7-14
माझ्याकडे २ मुली नोकरी मागायला आल्या होत्या, साधारण २० वर्षाच्या . १०वि पास ? दिसायला स्मार्ट होत्या , आम्हालाही गरज होती म्हणून ठेवल्या . कुणी आलं तर या बसा करतील ,नाव लिहून घेतील ,थोडा हिशोब लिहितील आणि Xerox काढून आणतील एवढी माफक अपेक्षा होती .
मग कळलं मराठी येत नाही ,English च तर नावच नको , आकडे लिहिता येत नाहीत , ३२५ --३००२५ असा लिहिलं कागद punch करायला सांगितले तर एकेका कागदावर खूपच भोकं पाडून ठेवली . काही बोललं तर राग पटकन येणार , आपल्याला येत नाही तर शिकून घ्यावं हे तर आजिबातच नाही .
नखरे , mobile, boyfriend ला phone हे व्यवस्थित .
एवढे advanced dumbo पहिल्यांदाच पहिले . मलाच २ सापडल्या तर अजून किती असतील ?
ह्या मुलींना कोणी काहीच शिकवलं नाही , शाळेत नाही आणि घरी पण नाही .
मी दम भरला तर माझ्याशीच खूप भांडल्या .
मी काय फार तर कामावर ठेवणार नाही , पण त्यांच्या फायद्या साठी तरी त्यांना आलं पाहिजे .
मला वाटतं असे कमी IQ चे असतील , त्यांना लिहिणे वाचणे आणि बेरीज वजाबाकी येव्हाड्यचीच शाळा असावी , बाकी जशी प्रगती दाखवतील तसं शिकवावं .
त्या कदाचित स्वयपांक चांगला करतील , मुलं चांगली सांभाळतील किंवा कलाकुसरीची कामं चांगलं करतील किंवा अजून काही ,पण ते त्यांचं त्यांनाच किंवा त्यांच्या आईवडिलांना शोधावं लागेल .
किंवा ultimate लग्न करून टाकतील .
No comments:
Post a Comment