30-5-14
ह्याचा अर्थ सांगा !!
अरिकुल वहनाचे वहन आणित होते .
शशिधर वहनाने मार्गी ताडन केले
समुद्र रिपुजाचा तात भंगोनी गेला
रविसुत महिसंगे फार दुख्खीत झाला .
*************************************************************************************
*************************************************************************************
अरिकुल म्हणजे कुंभाराचे कुळ --त्याचे वहन म्हणजे गाढव --त्याचे वहन म्हणजे मडके
शशिधर म्हणजे शंकर , त्याचे वहन म्हणजे नंदी ,म्हणजे बैल ,ताडन म्हणजे धिंगाणा
बैलाने रस्त्यात धिंगाणा घटला
समुद्राचा रिपुज म्हणजे शत्रू म्हणजे अगस्ती ऋषी---त्यांनी समुद्र पिऊन टाकला होता ,त्यांचा
तात ,म्हणजे वडील --म्हणजे मडके --त्यांचा जन्म मडक्यात झाला होता
मडके फुटले .
रवि म्हणजे सूर्य ,त्याचा सुत म्हणजे मुलगा ,म्हणजे कर्ण म्हणजे कान ,महिसंगे म्हणजे माझा .
माझा कान दुखावला
मी मडके आणत होते .
बैलाने रस्त्यात धिंगाणा घातला
मडके फुटले .
माझा कान दुखावला
No comments:
Post a Comment