ज्या क्रूरतेने आपल्या सैनिकांना मारले जात आहे , त्यात फक्त पाशवीपणा नाही तर प्रचंड 'hatred ' आहे . हे ' Taught to hate ' म्हणजे सतत सूडाचा मारा करायचा , तेच शिकवायचं . ते वाईट आहेत , त्यांना मारा , अगदी हालहाल करा हेच शिकवायचं
पाकिस्तान 'secular ' देश नाहीये , ते मुस्लिम राष्ट्र आहे . भारत secular आहे . म्हणजे त्यांनी मारायचं आणि भारताने सहन करायचं .
पण हे फक्त पाकिस्तान करतंय असं नाही , आतल्या आत पण खूप आहे . सगळ्या जाती धर्मात तेढ निर्माण करणे चालूच आहे .
आणि मजा म्हणजे वैयक्तिक पातळीवर सगळे दोस्त असतात , पण राजकारण आलं कि शत्रू.
आता दुकानात कोणी गिर्हाईक आलं कि कोण बघणार कुठल्या जाती धर्माचा आहे म्हणून ? किंवा पेशंट म्हणून , विद्यार्थी म्हणून , बस टॅक्सी रिक्षात पॅसेंजर म्हणून ?
मुद्दाम unrest व्हावी म्हणून हे घडवून आणलं जात आहे का ?
लोकांनी पण विचार करावा , आपला वापर केला जात आहे का ?
No comments:
Post a Comment