Wednesday, May 31, 2017


1-4-17

काही असे पेशंट येतात , BP वाढलंय , Bl sugar  वाढलीय  , का ? तर गोळ्या घेतल्या नाहीत . का ? तर संपल्या , मग आणल्या का नाहीत ? विसरलो , कंटाळा केला , पैसे नव्हते , वाटलं नाही घेतल्या तर काय होईल ? काही नाही होणार .
मग जे काही होतं ते एवढं महाग पडतं कि गोळ्या  घेतल्या असत्या तर बरं झालं असतं  असं वाटतं . चांगलाच पश्चाताप होतो .
कधी कधी epilepsy चे पेशंट पण मनानेच अशाच कारणाने गोळ्या बंद करतात . मग त्यांना कुठेही आकडी convulsion येतं . त्यावेळी ते कुठेही असू शकतात .
रस्त्यात , गॅस जवळ , काही काम करताना, कुठेही . त्यांना त्या वेळी ट्रीटमेंट मिळेल असे नाही . त्यांच्या किंवा त्यांच्यामुळे दुसऱ्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो किंवा इजा होऊ शकते .
ह्या लोकांना जर घरपोच दर महिन्याला किंवा १५ दिवसांनी ही औषधे मिळाली तर खूपच प्रॉब्लेम व complications कमी होतील .
समजा त्यांनी एखाद्या website किंवा NGO कडे नोंदणी केली तर ते हि जबाबदारी घेऊ शकतात .
खूप सिनियर citizens  हल्ली एकटेच राहतात , त्यांना पण हि सुविधा उपयुक्त ठरू शकेल .पैसे असतात पण आणून द्यायला कोणी नसतं ..
ज्या NGO लोकांना काम करायचे असेल त्यांना हे जमेल


No comments:

Post a Comment