Wednesday, May 31, 2017

4-4-17

अशा खूप पोस्ट येतात:----

शहरातल्या लोकांना  खेड्यातले जीवन कळत नाही ,
शेतकरी लोकांचे हाल AC मध्ये  बसणार्यांना कळत नाहीत ,
जज्ज लोकांना आरोपींचे दुःखच कळत नाही .

डॉक्टर लोकांना पेशंटचे व्याप कळत नाहीत ,

मुलीच्या बापाचे दुःख कोणाला कळत नाही

विदर्भाच्या समस्या उर्वरित महाराष्ट्राला कळत नाहीत .

नोकरी करणाऱ्या बाईचे हाल घरी बसणाऱ्या बायकांना कळत नाहीत .

शिक्षक , छोटे दुकानदार , LIC agent , पोलीस , सीमेवरचे सैनिक , पत्रकार , कोणीही . कुणी त्यांना समजूनच घेत नाही .
(डॉक्टर लोकांना पण कुणी  समजून घेत नाही) .

तर काय बरं करावे ?

मला वाटतं सामाजिक churning झालं पाहिजे . म्हणजे   AC मध्ये बसणार्यांनी बाहेरचे  जग बघावे , उन्हातान्हात फिरणार्यांनी  ऑफिस मध्ये एका जागी बसून दाखवावे .

मला पण डॉक्टरकीचा कंटाळा आला आहे . Actually I think I am a good doctor and proud of it too , but I would like to do something different .


मला शेतकऱ्यांची पत्रकार व्हायला आवडेल . कसं आहे नेमकं यांचं जीवन  समजून घ्यायला आवडेल .

बघू जमतंय का ?

नुसता वाद घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्यावे नाही का ?












No comments:

Post a Comment