4-4-17
अशा खूप पोस्ट येतात:----
शहरातल्या लोकांना खेड्यातले जीवन कळत नाही ,
शेतकरी लोकांचे हाल AC मध्ये बसणार्यांना कळत नाहीत ,
जज्ज लोकांना आरोपींचे दुःखच कळत नाही .
डॉक्टर लोकांना पेशंटचे व्याप कळत नाहीत ,
मुलीच्या बापाचे दुःख कोणाला कळत नाही
विदर्भाच्या समस्या उर्वरित महाराष्ट्राला कळत नाहीत .
नोकरी करणाऱ्या बाईचे हाल घरी बसणाऱ्या बायकांना कळत नाहीत .
शिक्षक , छोटे दुकानदार , LIC agent , पोलीस , सीमेवरचे सैनिक , पत्रकार , कोणीही . कुणी त्यांना समजूनच घेत नाही .
(डॉक्टर लोकांना पण कुणी समजून घेत नाही) .
तर काय बरं करावे ?
मला वाटतं सामाजिक churning झालं पाहिजे . म्हणजे AC मध्ये बसणार्यांनी बाहेरचे जग बघावे , उन्हातान्हात फिरणार्यांनी ऑफिस मध्ये एका जागी बसून दाखवावे .
मला पण डॉक्टरकीचा कंटाळा आला आहे . Actually I think I am a good doctor and proud of it too , but I would like to do something different .
मला शेतकऱ्यांची पत्रकार व्हायला आवडेल . कसं आहे नेमकं यांचं जीवन समजून घ्यायला आवडेल .
बघू जमतंय का ?
नुसता वाद घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घ्यावे नाही का ?
No comments:
Post a Comment