Friday, May 26, 2017

हा थोडा sensitive topic आहे , पण विचार व्हावा :---


एक सिनेमा आला होता , खूप जुना , मागच्या शतकातला १९४९ मध्ये ---'अंदाज ' . त्यात नर्गिस , राज कपूर आणि दिलीपकुमार होते . त्यात असं होता कि नर्गिसचं लग्न राजकपूर बरोबर ठरलेलं असतं , पण तो दूरदेशी असतो . तेंव्हा तिला दिलीपकुमार भेटतो , ते चांगले दोस्त होतात व हसून खेळून बोलू लागतात . तिचे वडील तेंव्हा तिला सांगतात कि तू ह्याच्याशी जास्त बोलत जाऊ नकोस , तुझं लग्न राजशी ठरलंय त्याला हे आवडणार नाही , पण ती ऐकत  नाही म्हणते कि तसं काही नाही , तो फक्त माझा दोस्त आहे . मग व्हाच तेच होते , हिचे मोकळेपणाने वावरणे , राजचा संशय , भांडणे वगैरे वगैरे .



आतापण माझ्या ओळखीच्या कितीतरी जणांची लग्ने मोडली आहेत , बऱ्याच ठिकाणी विचारलं तर मुलगा फार संशय घेतो , तू त्याच्याशी बोललीसच का ? , तू त्याच्याकडे बघून हसलीसच का ? तू त्याच्या बरोबर स्कूटरवर का गेलीस ? तू त्याचबरोबर कॅन्टीन मध्ये का गेलीस ? असा संशय घेतघेत शेवटी लग्न मोडतात .


त्या मुलींच्या डोक्यात काही नसेल पण , त्यांना मोकळेपणाने वागायची सवय असते तशा वागतात , नवरा , बॉयफ्रेंडला कधी राग येईल सांगता येत नाही ..


मजा म्हणजे आदल्या दिवशी पर्यंत चांगला मित्र असलेला नवरा झाला कि एकदम बदलतो . मुलींना काय झाले कळतंच नाही . लगेच नियम सुरु होतात , हे करायचे नाही , ते करायचे नाही .


मला वाटतं मुलांना लग्न झालं कि एक मालकी हक्काची जाणीव होते , हि आता माझी बायको , हिने मी सांगितल्या प्रमाणेच वागलं पाहिजे , दुसर्याशी बोलली तरी राग येतो . सगळे नवरे असे नसतात पण काही जरूर असतात .

बघता बघता situation बिघडते आणि सगळं बिघडून जातं .


आम्ही मेडिकलला शिकत असताना काही मुलींना सवय होती लाडे लाडे बोलायची ,सरांकडे जाऊन difficulty विचारायची .

आमचे एक म्हातारे सर होते , त्यांनी एकदा वर्गात सांगितलं " तुम्ही मुली हे लाडात येऊन बोलता , हातवारे करता , हसता , बघता त्यात समोरच्याला काय वाटत असेल ह्याचा विचार जरा करत जा . सगळ्या पुरुषांना वाटतं कि माझ्यावर खुश आहे आणि त्यांच्या मनात धुमारे फुटू लागतात . And this is across all strata of society and across all age groups..


थोडा commonsense वापरात जा , जरा alert राहा . उगीच नाही ते होऊन बसायचं . तुम्ही अजून अल्लड आहात , तुम्हाला career करायचे आहे थोडं   सांभाळून .



आजकाल ते IT सेंटर्स. मोठ्यामोठ्या इन्स्टिट्यूट्स मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नोकरी भरती होते . ते security लोक तर गावाकडून आलेले , तगडे आणि एकटे राहणारे असतात. त्यांना ह्या मुली बघून मनात वरखाली होत असेलच , मग ते मुलींवर attack करतात . मुली लाख म्हणू देत कि आम्ही काही बेताल वागलो नव्हतो पण ह्या प्रकारात जीव त्यांचाच जातो .


मुली पण फार बारीक बारीक , कमी जेवणाऱ्या आणि आपल्याच तंद्रीत असतात . एकटं राहायचं असेल तर स्वतःच्या संरक्षणाची काळजी घ्यावी .


बऱ्याच वर्षपूर्वी आम्ही राजस्थानला गेलो होतो , तिथे आम्हाला एका हॉटेलमध्ये चहा प्यायला नेलं  होतं . एक्दम साधं हॉटेल होतं . तिथे खेड्यातले गाववाले राजस्थानी आले होते . त्याच्या बायका घुंगट मधे . आमच्या ग्रुप मध्ये सगळ्या बायकांनी जीन्स टॉप्स घातले होते . आम्हाला बघून ते राजस्थानी हसू लागले , मोठ्याने बोलू लागले , त्यांनी असे कपडे घातलेल्या बायका पहिल्याच नसतील . इथे शहरात काही वाटत नाही पण तिकडे ते लोक हसताना पाहून कसलं तरीच झालं .



म्हणजे महिला स्वातंत्र्य बरोबरच आहे पण त्याला जरा सारासार विचाराची सोबत असेल तर जास्त बरे.  



No comments:

Post a Comment