हल्ली मुलं दोन -अडीच वर्षाची झाली कि त्यांना playgroup , nursery च्या शाळेत पाठवतात . बहुतेक घरात भावंड नसतं किंवा सांभाळायला कुणी नसतं किंवा जर दुसऱ्या मुलांची ,माणसांची सवय व्हावी हे पण कारण असतं .
पण मुलं अजून छोटी असतात , प्रतिकार शक्ती (immunity )पूर्ण विकसित नसते . ती ५ वर्षांपर्यंत होते . म्हणून Immunisation ५ वर्षांपर्यंत चालतं (पुढे पण असतं पण ५ वर्षांपर्यंत महत्वाचे ).
या वयात मुलांना अधूनमधून आजारपण येतच असतं . थोडी तब्येत नरमगरम वाटली , रडू रडू करत असेल , अंग ...थोडं कोमट ,थोडी सर्दी असं असेल तर शाळेत पाठवू नये .
घरी एक दिवस राहिले , गरम वरण भात खाल्ला , चांगली झोप झाली कि बरे होतात.
बरं नसताना शाळेत पाठवलं कि एक दिवसाचे दुखणे ४ दिवसांवर जाते . त्या पेक्षा एक दिवस बुट्टी मारलेली बरी .
आणि अशी आजारी मुलं शाळेत आली कि अजून १०-१२ मुलं cross - infection होऊन आजारी पडतात .
मुलं सारखी सारखी आजारी पडली तर तब्येत कमजोरच राहते , पुढे मोठेपणी त्रास होतो .
मुलाच्या आईला नोकरी असेल तर तिला पण दांड्या मारून चालत नाही . तर मुलं होऊ द्यायची असतील तर backup चांगला पाहिजे .
त्यामुळे political कारणासाठी तरी माता लोकांनी घरातल्या senior मंडळींशी संबंध चांगले ठेवावेत . अशा वेळेला उपयोगी पडतात .
No comments:
Post a Comment