Friday, July 7, 2017

मला वाटतं आपल्या India चा speed 'सावकाश ' आहे .

सावकाश गोष्टी केल्या कि बरोब्बर होतात .

लग्नात नाही का म्हणत "सावकाश जेवा " ?

...

सावकाश जेवलं कि अन्न बरोब्बर पचतं .

सावकाश गाडी चालवावी , सावकाश विचार करून निर्णय घ्यावेत ,घाईघाईने कोणाबद्दल मत बनवू नये .

हल्ली लोकांना फार एकावर एक कामं घ्यायची सवय लागली आहे .हे झालं कि ते , ते झालं कि ते . स्वतःला फार गुंतवून ठेवतात .

आपण busy असलं पाहिजे आणि लोकाना दिसलं पण पाहिजे नाहीतर आपलं status कमी होतं असं बऱ्याच जणांना वाटतं .

ह्यातून चुका होतात , accident होतात , काहीतरी महत्वाचे विसरले जाते ,decision चुकतात .

कधी कधी फार महागात पडतं .

शरीराला , मनाला आराम हवाच कि !!

अजून एक गोष्ट . फार busy असलात तर आजूबाजूचे परस्पर काहीतरी कारभार करतात ते अंगाशी येऊ शकतं . बारीक लक्ष ठेवता येत नाही , काहीतरी महत्वाचे नजरेतून सुटतं . आपलं लक्ष आहे हे पण लोकांना कळलं पाहिजे .

"In a jiffy ", "I want it done yesterday " ह्या American terms popular आहेत पण आपल्याकडे असं होत नाही .

खूप लोकांवर कामाचे pressure प्रचंड आहे , मग खूप थकवा येतो , जाता जात नाही . ह्याला 'Chronic fatigue syndrome ' असं नाव आहे .

कधी कधी वेगाने व नेमके काम करावे लागते ,पण सतत नसे नसावे . It is damaging to the body .

जगणं सोपं आणि सुटसुटीत करता आलं पाहिजे .

No comments:

Post a Comment