मला वाटतं आपल्या India चा speed 'सावकाश ' आहे .
सावकाश गोष्टी केल्या कि बरोब्बर होतात .
लग्नात नाही का म्हणत "सावकाश जेवा " ?
...
सावकाश जेवलं कि अन्न बरोब्बर पचतं .
सावकाश गाडी चालवावी , सावकाश विचार करून निर्णय घ्यावेत ,घाईघाईने कोणाबद्दल मत बनवू नये .
हल्ली लोकांना फार एकावर एक कामं घ्यायची सवय लागली आहे .हे झालं कि ते , ते झालं कि ते . स्वतःला फार गुंतवून ठेवतात .
आपण busy असलं पाहिजे आणि लोकाना दिसलं पण पाहिजे नाहीतर आपलं status कमी होतं असं बऱ्याच जणांना वाटतं .
ह्यातून चुका होतात , accident होतात , काहीतरी महत्वाचे विसरले जाते ,decision चुकतात .
कधी कधी फार महागात पडतं .
शरीराला , मनाला आराम हवाच कि !!
अजून एक गोष्ट . फार busy असलात तर आजूबाजूचे परस्पर काहीतरी कारभार करतात ते अंगाशी येऊ शकतं . बारीक लक्ष ठेवता येत नाही , काहीतरी महत्वाचे नजरेतून सुटतं . आपलं लक्ष आहे हे पण लोकांना कळलं पाहिजे .
"In a jiffy ", "I want it done yesterday " ह्या American terms popular आहेत पण आपल्याकडे असं होत नाही .
खूप लोकांवर कामाचे pressure प्रचंड आहे , मग खूप थकवा येतो , जाता जात नाही . ह्याला 'Chronic fatigue syndrome ' असं नाव आहे .
कधी कधी वेगाने व नेमके काम करावे लागते ,पण सतत नसे नसावे . It is damaging to the body .
जगणं सोपं आणि सुटसुटीत करता आलं पाहिजे .
No comments:
Post a Comment