Sunday, July 23, 2017

अंबानींचा JIO :--
१५००/- रु फोन ?
कुठल्या हिशोबाने त्यांनी हे venture केले आहे कळत नाही . तो फोन बनवायला १५००/- पेक्षा नक्कीच जास्त लागले असतील .
...
हा कुठला बिझनेस प्लॅन आहे ? कॉम्पिटिशनला संपवायचा आहे का ? का अजून काही ?
८०-८१ साली धीरूभाई अंबानीने Vimal कंपनी काढली होती . तेंव्हा खूपंच बायका नोकरी करू लागल्या होत्या . तेंव्हा त्यांनी ज्या साड्या बनवल्या होत्या त्या जाम टिकाऊ , धुतल्या कि पटकन वाळणाऱ्या आणि इस्त्री न लागणाऱ्या अशा होत्या . design पण नवीन होते . बायका खुश होत्या .
त्यांनी तेंव्हा लोकांना काय हवंय ते जाणलं आणि लोकांनी पण भरपूर प्रतिसाद दिला .
नंतर त्यांनी किती कंपन्या काढल्या , कायकाय उद्योग केले , बरेच आगेपीछे पण केले , पण ते वाढतंच गेले .
हे JIO म्हणजे त्यांनी लोकांना जाणलं आहे का ? आत्ता आपल्या देशात लोकांना खूप सारे हवे आहे पण पैसे नाहीयेत . त्यांच्या इच्छा आहेत पण सगळं महाग झालंय .
आपल्या कंट्री मध्ये 'High turnover low cost ' हे लागू पडतं . प्रचंड लोकसंख्या , सगळ्यांच्याच गरजI वाढलेल्या . ते गोष्टी विकत तर घेणार आहेतच पण महाग झाल्यामूळे चिडचिड होते आहे .
हे सगळ्याच बाबतीत होते आहे , मेडिकल ट्रीटमेंट , शिक्षण , कपडे , लग्नाचा खर्च . जे म्हणाल ते .
लोकांना माफक दरात , average to good quality हवी आहे . खूप पॉश नको , साधारण चालेल पण दर माफक असावेत . त्याचे compensation turnover वाढवून होते .
हे गणित त्यांना जमले आहे .
प्रत्येक गिर्हाईकांकड्न खूप पैसे घेण्यापेक्षा ,,, प्रत्येकाकडून माफक घ्या आणि खूप जणांना सर्विस द्या .
ते चिनी सामान पण त्यामुळेच आपल्याकडे चालते . स्वस्त असते , जेवढे दिवस टिकेल तेवढे टिकेल . खूप टिकावं अशी अपेक्षाच नसते .
रस्ते पण असेच , महिनाभर बरे दिसले तरी खूप झाले .
मला तर वाटते आहे मुकेश अंबानींचा Guide मधला Dev Anand झालाय . एक अवस्था अशी येत असेल कि मला आता नको , दुसऱ्याला द्यावेसे वाटते . असे झाले असेल का ?
हे venture लॉस मध्ये गेलं तरी त्यांना नुकसान झेपेल .
आपल्याकडे कोणाकडे कितीही पैसे असले तरी अजून मिळाले तर हवेच असतात , सगळीकडे हेच दिसते , त्यामुळे अंबानीने हे केले आहे ते कसे काय असे वाटते .
जेंव्हा लोक म्हणत होते India मध्ये काही अर्थ नाही आणि भरभरून परदेशात गेले , तेंव्हा त्यांनी आपल्या देशातल्या लोकात , इथल्या कंडिशन मध्ये इंटरेस्ट घेतला आणि यशस्वी होऊन दाखवले . लोकांना पण पैसा कमवून दिला , नोकऱ्या दिल्या ती पण अचाट गोष्ट आहेच कि !!
Only time will tell whether this is successful or not .
Ambanis are famous for their 'Out of the box ' thinking

No comments:

Post a Comment