अतिरेक :--
मागे झाडे एवढी लोकांनी तोडली कि मग अनेक NGO , पर्यावरणवादी पुढे येऊन झाडे तोडायचीच नाहीत असे झाले , फांदी तोडली तरी गुन्हा .
एखादे झाड वठले आहे , पडायचाच बेतात आहे तरी तोडत नाहीत .
...
रस्त्यावरच्या कुत्र्यांना मारायचे नाही , नाही म्हणजे नाही . मग ते पिसाळलेले का असेना . लोकांना चावत का असेना . मुनिसिपालिटी ने अशा भटक्या कुत्र्यांसाठी shelter करावेत , पण ते नाही . रात्री किंवा पहाटे जे लोक ये जा करतात त्यांना किती भीती वाटते हे कोण लक्षात घेणार ?
इंदिराबाई गांधीच्या लक्षात आले होते कि आपली लोकसंख्या फार झाली आहे , control करावी लागेल . तेंव्हा family प्लांनिंगचा अतिरेक झाला , सत्ता गेली , तेंव्हा पासून एकही सरकारने फॅमिली प्लांनिंगचा मुद्दा घेतला नाही .
सासवांनी सुनांना एवढे छळले , घरकामावरून , पैशावरून , मुलगा हवाच म्हणून कि मुलींनी धसकाच घेतला आहे , एकतर लग्न करत नाहीत नाहीतर पळून येतात .
शिक्षणाचे एवढे अवडंबर झाले आहे कि शिक्षण उगीच महाग करून ठेवले आहे . लोक जातात आणि येतात पण पुढे नोकरी मिळवायला , आयुष्यातल्या प्रॅक्टिकल गोष्टी हाताळायला गोंधळ .
कुठल्या यात्रेला , जत्रेला किंवा सुट्टीवर इतके लोक एकाच ठिकाणी जाणार कि तिथली यंत्रणा मोडून तोडून पडली पाहिजे
जिथे मतलब आणि फायदा आहे ते बरोब्बर केले जाते , नाहीतर नाही .
सारासार विवेकबुद्धी , Power of discretion असलं काही नाहीच .
No comments:
Post a Comment