आजकाल सिनेमाचे reviews येतात त्यात त्याच्या संगीता बद्दल एकंच वाक्य असतं ' एकही गाणं लक्षात राहत नाही '.
हे पटलं . जुनी गाणी कशी पाठ व्हायची , मधल्या म्युसिक संकट ते आता लक्षात पण राहत नाही इथपर्यंत आलंय .
आपल्याला गाणी लागतात , जुनी गाणी आहेत छान पण किती वर्ष चालवायची ? , किती orchestra ह्या गाण्यांवर चाललेत , स्वतःचे एकतारी गाणे बनवावे . प्रयत्न तरी करावा .
सिनेमाच्या यशात त्याच्या गाण्यांचा मोठा हात असतो . सैराट मध्ये पण गाण्यांनी मोठा हात दिला . त्या डिरेक्टरला पण म्युसिक sense असावा लागतो , त्याशिवाय होत नाही .
आपल्याकडे गाणे बनवणाऱ्यापेक्षा गाणाऱ्याला जास्त प्रसिद्धी मिळते . दुसरे गायक त्यांची कॉपी करू म्हटले तरी जमत नाही कारण ते गाणं ते ऐकून शिकतात , मूळ गाणाऱ्याने ते ज्याने बनवले आहे त्यांच्या बरोबर बसून , रिहर्सल करून , एकेक जागा बसवून घेतलेल्या असतात , त्यामुळे गाण्याला रंगात येते , खुलते . त्यांची thought process कधी कोणी बघितलीच नाही , हे गाणं असं का ? दुसऱ्या कोणत्या चाली होत्या ? हा राग का निवडला ?
आपल्याकडे किती तरी पडेल चित्रपटात एकापेक्षाएक बहारदार गाणी आहेत . अजून लक्षात आहेत .
ती creativity गेली काय ?
साधं शाळेत कविता शिकवताना पण चाल चावून शिकवली तरी लक्षात राहते , मुलांना मजा येते . तिथूनच creativity ला सुरुवात होते .
हे एक 'काबील ' सिनेमातलं गाणं , मला डान्स आवडला , गाणं नाही . दोघं आंधळे आहेत आणि तो तिला डान्स शिकवतो आहे , choreography छान आहे .
Looking forward to some new interesting , lovely and memorable music.
No comments:
Post a Comment