Tuesday, June 13, 2017

आमचं लग्न झालं तेंव्हा आमच्या सासूबाई ज्या वयाच्या होत्या त्या वयाची मी आता आहे . ५४ .

त्या एकदम सुगरण होत्या , अन्नपूर्णा , काहीही केलं तरी चविष्ट व्हायचं . त्यांच्या हाताखाली काम करून मी पण बरंच शिकले . दम पण खूप भरायच्या , पण माझी आईच मला एवढी फायरिंग द्यायची कि ह्यांचं दम भरणं मला नॉर्मल वाटायचं . It's ok type . पुन्हा मेडीकलला बोलणी खाण्याला अंतच नसIयचा त्यामुळे कधी मनावरच घेतलं नाही .

हल्ली जरI बोललं कि काय राग येतो लोकांना , फारच झालंय मानपान .

...

तर असो !

तर मी साखरांबा केलाय . सासूबाई कैरीचा कीस काढून त्याचI साखरांबा करायच्या आणि त्यात वेलदोडे घालायचे आणि फोडी करून गुळांबा करायच्या त्यात लवंग घालायची .

मी एकाच केलाय दीड किलोचा ,साखर पण घातली आणि गुळ पण घातला , वेलदोडे, लवंग केशर सगळं घातलं, मस्त झालाय .

ह्यात एक tip आहे , कैऱ्या किसून झाल्यावर , साखर , गुळ जे काय घालायचं असेल ते घालून एक-दीड तास तसेच ठेवायचे म्हणजे साखर मुरते नाहीतर कैऱ्या आणि साखर गुळ एकजीव होत नाहीत .

काहीजण एक पाऊस पडल्यावर करतात, काही आधी --Two schools of thought . पाऊस पडल्यावर केला तर म्हणतात जास्त टिकतो पण मला वाटतं कैऱ्यांचा करकरीतपणI कमी होतो आणि पाऊस पडल्यावर चिखलात जाऊन आणायला कंटाळा येतो .

So that's that ......

नवीन मुलींनी पण करायला हरकत नाही , सोप्पा आहे , आधी अर्धा किलोचा करायचा , जमलं तर मग जास्त . डरनेका नही करनेका । .

ह्याच्या मागचं logic असं असेल कि पावसाळ्यात बाहेर जायला जमलं नाही तर घरात जरI चवीसाठी असावं. आता लोणचं पण करणार आहे . हल्ली विकत सगळं मिळतं पण आपण करायची गम्मत वेगळीच .

No comments:

Post a Comment