पारंपारिक शेतकरी असल्याशिवाय शेती करता येत नाही , शेती विकत घेता येत नाही , BSC agriculture करता येतं का ?
शेती मध्ये इन्व्हेस्ट करता येत नाही ,
बाहेरचा पैसा आणि त्याहून मोठं आयडिया आणि टेकनॉलॉजि येऊ देत नाहीत . नवीन विचार , बाहेरच्या जगातल्या नवीन कल्पना येऊ देत नाहीत , मग प्रगती होत नाही आणि शेतकरी नुकसानीतच जातो .
शेतकऱ्यांकडून माल घेणारे मधले दलाल कोण आहेत ?, ते का बोलत नाहीयेत ? ग्राहक , दलाल आणि शेतकरी अशी ही साखळी आहे , मग मधले दलाल यात नाही कसे ? नाव पण घेत नाही कुणी .
शहरातल्या तरुणाईला पण शेतीत इंटरेस्ट असू शकतो , त्यांना येऊ दिलं नाही तर ते आपला पैसा दुसरीकडे गुंतवतील किंवा परदेशी जातील .
शेतकऱ्याची holding power वाढवायची असेल तर cold storage हवेत .
कोणी काही सांगायला गेलं कि म्हणतात तुम्ही कधी शेती केली आहे का ? तुम्हाला काय कळतंय ?
बाकी जनतेनी आता ह्या शेतकरी बंधूंच्या आयुष्यात इन्टेरेस्ट घेतला पाहिजे , ज्यांचे नातेवाईक आहेत तिकडे ये जा केली पाहिजे . प्रॉब्लेम समजून घेऊन उपाय शोधले पाहिजेत .
Special agricultural consultants आणि financial advisers हवेत .
करायचं झालं तर खूप काही करता येईल . हे शेतकरी सतत दुःखी आणि कर्जबाजारी आणि कधीही आत्महत्या करणार असे असेल तर लोकांना पण जेवण गोड लागणार नाही .
अन्नदाता सुखी असेल तरच जनता सुखी राहील .
No comments:
Post a Comment