Saturday, June 10, 2017

पारंपारिक शेतकरी असल्याशिवाय शेती करता येत नाही , शेती विकत घेता येत नाही , BSC agriculture करता येतं का ? 

शेती मध्ये इन्व्हेस्ट करता येत नाही ,

बाहेरचा पैसा  आणि त्याहून मोठं आयडिया  आणि टेकनॉलॉजि येऊ देत नाहीत . नवीन विचार , बाहेरच्या जगातल्या नवीन कल्पना येऊ देत नाहीत , मग प्रगती होत नाही आणि शेतकरी नुकसानीतच जातो . 

शेतकऱ्यांकडून माल  घेणारे मधले दलाल कोण आहेत ?, ते का बोलत नाहीयेत ? ग्राहक , दलाल आणि शेतकरी अशी ही साखळी आहे , मग मधले दलाल यात नाही कसे ? नाव पण घेत नाही कुणी . 

शहरातल्या तरुणाईला पण शेतीत इंटरेस्ट असू शकतो , त्यांना येऊ दिलं नाही तर ते आपला पैसा  दुसरीकडे गुंतवतील किंवा परदेशी जातील . 

शेतकऱ्याची holding power  वाढवायची असेल तर cold storage हवेत . 

कोणी काही सांगायला गेलं कि म्हणतात तुम्ही कधी शेती केली आहे का ? तुम्हाला काय कळतंय ?

बाकी जनतेनी आता ह्या शेतकरी बंधूंच्या आयुष्यात इन्टेरेस्ट घेतला पाहिजे , ज्यांचे नातेवाईक आहेत तिकडे ये जा केली पाहिजे . प्रॉब्लेम समजून  घेऊन उपाय शोधले पाहिजेत . 

Special agricultural  consultants  आणि financial advisers हवेत . 

करायचं झालं तर खूप काही करता येईल . हे शेतकरी सतत दुःखी आणि कर्जबाजारी आणि कधीही आत्महत्या करणार असे असेल तर लोकांना पण जेवण गोड लागणार नाही . 

अन्नदाता सुखी असेल तरच जनता सुखी राहील . 






No comments:

Post a Comment